" ध्यास विकासाचा गुणवत्ता वाढीचा "

झेप यशाची : बोधकथा संग्रह

बोधकथा संग्रह

    बोधकथा

                                                                         १.श्रेष्ठ कोण ? ‍‍

       एक माणूस अरण्यात फिरत असता तेथे त्याची एका सिंहाशी भेट झाली. त्यावेळी त्या दोघांनी निरनिराळय़ा विषयांवर बर्‍याच गप्पा मारल्या व त्यामुळे ते दोघे एकमेकांस आवडू लागले. शेवटी मात्र ते 'माणूस श्रेष्ठ कीसिंह श्रेष्ठ?' या विषयावर बोलू लागले व त्याचे वादात रूपांतर झाले. ते दोघेही भांडू लागले. नुसत्या बोलण्याने माणसाचे श्रेष्ठत्व त्या माणसास सिध्द करता येईनातेव्हा त्याने आपल्याजवळ असलेले चित्र त्याला दाखविले. सिंहाची आयाळ हातात धरून त्याच्या पाठीवर एक माणूस आहे असे ते चित्र होते. ते पाहून सिंह त्याला म्हणाला, 'ज्याने हे शिल्प तयार केले तो मनुष्य होतातोच जर सिंह असता तर माणसाच्या छातीवर बसून सिंह त्याला मारतो आहेअसे त्याने दाखविले असते.'

तात्पर्य - प्रत्येक जण वाद घालताना स्वत:ला अनुकूल असतील अशीच प्रमाणे पुढे मांडतो. दुसर्‍या बाजूची प्रमाणे समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही.


                                                               २. ज्ञानाचा गर्व

            आगगाडीचा प्रवास करीत असतानाएका प्राध्यापकाला आपल्या शेजारी एक आडाणी शेतकरी बसला असल्याचं आढळून आलं. स्वत:च्या ज्ञानाची घमेंड बाळगणारा तो प्राध्यापक थोडय़ाच वेळात त्या आडाणी शेतकर्‍याची थट्टा करून आजूबाजूच्या बसलेल्या प्रवाशांची करमणूक करू लागला. थोडा वेळ ती थट्टा निमूटपणे सहन केल्यावर तो शेतकरी त्या प्राध्यापकाला म्हणालासाहेबकाही झालं तरी तुम्ही ज्ञानी आणि मी अज्ञानी. तरीसुद्धा आपला गाडीतला वेळ चांगला जावाम्हणून आपण एकमेकांना कोडी घालूया. मी आडाणी व गरीब असल्याने कोडं सोडवण्यात जर मी हरलोतर मी तुम्हाला फक्त पाच रुपये द्यायचे आणि जर तुम्ही हरलाततर तुम्ही मात्र मला पंचवीस रुपये द्यायचे. आहे कबूल? हे ऐकून तो प्राध्यापक आनंदला आणि अवतीभवतीच्या सहप्रवांशावर छाप मारायलाही सुसंधी आपल्याकडे आपणहून चालून आली आहे असा विचार करून त्या शेतकर्‍याला म्हणालातुझी कल्पना मला मान्य आहे. पहिलं कोडतू मला घाल.
शेतकर्‍यानं विचारलंज्याला उडताना तीन पायचालताना दोन पाय आणि बसला असता फक्त एक          
पाय असतो, असा पक्षी कोणता ? 

    या कोडय़ाचं उत्तर देता न आल्यानं प्राध्यापक काहीसा ओशाळून म्हणालाबाबा रेमी हरलो. हे घे पंचवीस रुपयेआणि या कोडय़ाचं उत्तर तू मला सांग. प्राध्यापकानं दिलेल्या पंचवीस रुपयांपैकी वीस रुपये स्वत:च्या खिशात टाकूनउरलेले पाच रुपये त्या प्राध्यापकाच्या हाती देत तो शेतकरी म्हणालामला सुद्धा या कोडय़ाचं उत्तर देता येत नाहीम्हणून मी हरल्याचे पाच रुपये तुम्हाला देत आहे एक आडाणी शेतकर्‍याने हातोहात चकविल्यामुळे फजिती पावलेला तो प्राध्यापक झटकून तिथून उठला व दुसर्‍या डब्यात गेला.
तात्पर्य- ज्ञानाचा गर्व करू नये.

                      ठकास महाठक

   एकदा एक सिंह आजारामुळे खूप दुबळा झाला. तेव्हा त्याची विचारणा  करायला जंगलातील  प्राणी, पक्षी येत-जात असत. तेव्हा एक लांडगासुद्धा सिंहाच्या भेटीला तेथे आला .त्याने सिंहाची विचारपूस केली व सिंहाचे कान भरायला सुरुवात केली  ती अशी. लांडगा सिंहाला म्हणाला, महाराज क्षमा असावी, पण एक गोष्ट विचारायचे धाडस करू काय तेव्हा सिंहाने लांडग्याला लगेच परवानगी दिली व म्हणाला विचार काय विचारायचे ते ?  तेव्हा लांडगा म्हणाला ,महाराज आपल्या आजाराची विचारण करायला जंगलातील सर्व प्राणी आले पण ...! पण काय .....सिंह   म्हणाला . महाराज  या प्राण्यांमध्ये मला  कोल्हा  दिसला नाही .  नाही मी सहज  विचारलं या कोल्ह्याला  महाराजांबद्दल बिलकुल आदर नाही, असे मला  वाटते. नाहीतर तो एकदा तरी येऊन गेला असता . कोल्हा तेवढ्यातच तेथे येऊन उभा झाला. लांडग्याचे शेवटचे शब्द कोल्ह्याच्या कानावर पडले होते .तेव्हा कोल्हा शांतपणे  म्हणाला महाराजांनी एकदा माझे बोलणे शांतपणे ऐकून घ्यावे  नंतर काय  ते बोलावे. महाराज आजपर्यंत एवढे  पशु आपल्या भेटीला आले ,पण कोणी आपल्या आजाराचा उपाय शोधला या उपायासाठी मी आजपर्यंत खटपट करत होतो व ते  औषध  शोधल्यावरच मी आपल्याजवळ आलो.सिंह म्हणाला,सांग मग काय उपाय शोधला तू ! महाराज औषध एकदम रामबाण शोधल आहे. सांग बाबा लवकर काय ते औषध आहे सिंह म्हणाला .कोल्हा म्हनला ते औषध असे आहे की एका जिवंत लांडग्याचे कातडे सोलून ते गरम असतानाच तुम्ही अंगावर घेतले म्हणजे झालं . त्याच क्षणी लांडगा तेथे मारला गेला   
तात्पर्य- कोणाचे कान भरण्यापेक्षा त्यांच्यातला सद्भावना जागृत करणे केव्हाही उत्तम !

                    जोतीष्यची फजिती                  

      एका नगरात एक भामटा ज्योतिषी दररोज एका रस्त्याच्या कडेला बसून लोकांचे भविष्य सांगत असायचा. दररोज तो समोर जन्मकुंडल्या घेऊन एक महान ज्योतिषी आणि हस्तरेखा तज्ञ असल्याचे लोकांसमोर सांगत असायचा .लोकही त्याला आपले भविष्य विचारत. मग तो त्यांचे भविष्य सांगून त्यांना खुश करीत असायचा. अशा प्रकारे त्याने  अमाप धनदौलत  कमावली 
     एके दिवशी तो लोकांचे भविष्य सांगण्यात  गुंतला असताना  एक  व्यक्ती त्याच्याकडे पळत-पळत येतो आणि म्हणतो की तुमच्या घरामध्ये चोरी झाली आहे त्यावर तो आपल्या घराकडे जात असताना मध्येच त्याला एक व्यक्ती अडवतो आणि अशाप्रकारे  धावण्याचे कारण विचारतो. यावर तो ज्योतिषी  स्वत:च्या घरी चोरी झाल्याचे सांगतो .यावर तो व्यक्ती म्हणतो , ही  गोष्ट अतिशय आश्चर्यकारक आहे कीजो व्यक्ती  दुसऱ्या लोकांचे दुर्भाग्य ओळखतो . त्याला स्वत:च्या दुर्भाग्याबद्दल माहित नाही. यावर तो ज्योतिषी शरमेने मन खाली घालतो आपला घमंडी ,भामटेपणा लोकांसमोर व्यक्त करत असतो. 
तात्पर्य- ज्योतिष, भविष्य सांगणार्यावर विश्वस ठेऊ नये.

                 जनसेवा  हीच माझी ईश्वरसेवा

    
    महात्मा गांधीजींना अनेक लोक भेटायला येत. गांधीजींच्या नुसत्या सहवासातूनच लोकांना  कितीतरी गोष्टी सांगण्याची गांधीजींची पद्धत अतिशय प्रभावी होती. त्यामुळे त्यांच्या भेटीला  येणारा प्रत्येक माणूस तेथून निघतांना प्रेरणा घेऊनच निघत असे .
    एकदा एक गृहस्थ गांधीजींना भेटायला आले. नेहमी काही वेळ ते त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर बोलत असे. पण त्या दिवशी गांधीजी  त्यांना म्हणाले,' क्षमा करा, पण आता माझी मंदिरात  जाण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे मी आता तुमच्याशी बोलू शकत नाही. यावर ते गृहस्थ म्हणाले, 'हो का मलासुद्धा येथून मंदिरातच जायचे होते त्यामुळे आता आपण सोबतच मंदिरात जाऊ आणि पूजा करू. ' हे उद्गार ऐकून गांधीजी किंचित हसले आणि म्हणाले, 'परंतु मला तुम्ही जात असलेल्या मंदिरात जायचे नाही. माझे मंदिर वेगळे आहे. म्हणजे काय हे त्याला कळलेच नाही. तरीही त्या व्यक्तीने गांधीजींसोबत येण्याचा आग्रह केला . गांधीजी म्हणाले, 'ठीक आहे तुमचा हट्ट आहे तर चला माझ्याबरोबर.' असे म्हणून ते त्या गृहस्थाला  आपल्यासोबत घेऊन गेले . गांधीजी ज्या ठिकाणी गेले ते ठिकाण बघून त्या गृहस्थाला मोठा धक्का तर बसलाच पण मनापासून गांधीजींचे पाय धरावेसे वाटले . कारण गांधीजी एका वृद्धाश्रमात गेले होते आणि तेथील वृद्धांची  ते सेवा करत होते. ते म्हणाले ,'हेच माझे मंदिर आहे आणि जनसेवा  हीच माझी ईश्वरसेवा आहे.त्या गृहस्थांच्या मनात गांधीजीबद्दलचा आदर कित्येक पटींनी वाढला .
  तात्पर्य- जनसेवा  हीच  ईश्वरसेवा

                                                              संयमाचे महत्त्व

एक मूर्तिकार मर्ती व पुतळे अगदी हुबेहूब बनवी. तो ज्याचा पुतळा  र्ती करी, ती व्यक्ती वा देव प्रत्यक्षच त्याच्या चित्रशाळेत अवतरल्याचा भास होई. एकदा त्याने खुर्चीत बसलेला व हातात काठी घेतलेला रखवाल दराचा पुतळा तयार कोला. खराखुराच रखवालदार पहार्‍यावर बसला असल्याचा चोर-व दरोडेखोरांचा समज होऊन ते त्या मूर्तिकाराच्या घराच्या आसपास फिरकण्याचा विचार सोडून देत
नामवंत कलावंत म्हणून त्याच्या पन्नाशीच्यासाठीच्या व पंचाहत्तरीच्या वेळी त्याचे अनेक शहरांतून सत्कार झाले होतेआता आता त्याने शंभरी गाठली. यमदुताला हुलकावणी देण्यासाठी त्याने आपल्यासारखे हुबेहूब दहा पुतळे तयार केले. एकदा त्याला आपल्याला न्यायला आपल्या घराकडे काही यमदूत येत असल्याची चाहूल लागली तो पट कन आपल्या चित्रशाळेत गेला व तिथे ठेवलेल्या आपल्या नऊ पुतळय़ांत दहावा पुतळा म्हणून निश्‍चलपणे बसून राहिला. यमदूत त्या चित्रशाळेत शिरले .. पाहताततो तिथे एकासारखे एक असे दहा पुतळे. कुणाला घेऊ जावे?
  हा त्यांच्यापुढे पेच पडला तेवढय़ात त्यांच्यापैकी एक डोकेबाज यमदूत आपल्या सहकार्‍यांना मुद्दाम म्हणाला, 'बाबांनोअसे गोंधळून जाण्यासारखे काय आहेकारण खर्‍या मूर्तिकारात जे एक व्यंग आहेते त्याच्या बाकीच्या नऊ पुतळय़ांत दाखवायचे राहून गेले आहे.
त्या बुद्धिवान यमदुताच्या या विधानाने अपमानित झालेला तो मूर्तिकार पटकन उठून म्हणाला, 'उगाच जीभ आहे म्हणून काही तरी बडबडू नकोसमाझ्यात असलेला कोणता  दोष मी या माझ्या पुतळय़ात दाखविलेला नाही?' यावर तो चतुर यमदूत म्हणाला, 'हे चित्रकारा तुझ्यात आणि या तुझ्या पुतळय़ात काही एक फरक नाही पण 'तुझ्याप्रमाणे बोलत नाहीत.
तात्पर्य-  जिभेवर संयम नसल्यावर आपले नुकसान होते.


                 नक्कल म्हणजे अनुकरण नव्हे

   
सातवीतला तनिष हा नकाला चांगल्या करायचा. मित्रांच्या बोलण्याच्या लकबी, शिक्षकांच्या बोलण्याच्या लकबी तो सहज करत असे. शिक्षकांना त्याच्यातील हा गुण माहिती होता ,त्यामुळे त्याला शिक्षकांनी सांगितले होते  कीतू नकला चांगल्या करतोस हे ठीक आहे पण नक्कल करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचे अनुकरण करावे .नक्कल ह्याचा अर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे हुबेहूब वर्तन ,त्याचे हावभाव जसेच्या तसे व्यक्त करणे होय,पण अनुकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीतील चांगले गुण स्वत: रुजवून आपला विकास करणे होय .
            तनिषने शिक्षकांचे हे म्हणणे काही ऐकले नाही .नक्कल करणेच त्याला योग्य वाटले .एकदा शिक्षक दिना दिवशी सगळी मूले  वेगवेगळ्या वर्गात शिक्षकांचे काम करणार होते .थोडक्यात त्यांना वर्गावर शिक्षकांच्या ऐवजी शिकविण्यासाठी जायचे होते. तनिषही पाचवीच्या वर्गावर शिकवण्यासाठी गेला. त्याला वाटले आपण एखाद्या शिक्षकांची नक्कल करून तास संपवू या . फारसे अवघड काही नाही. असा विश्वास ठेवून तो वर्गावर गेला .विषयांशी निगडित असलेल्या शिक्षकांची त्याने अचूक नक्कल केली .पण शिकवताना त्याला एका विद्यार्थ्याने पाठासंबंधी प्रश्न विचारला .तनिषला केवळ नक्कलच माहित होती. विचारलेल्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे ,याचा विचारच त्याने केला नव्हता .सगळी मुले हसायला लागली त्याची थट्टा करू लागली.
तात्पर्य-  नक्कल करण्यापेक्षा अनुकरण करणे अधिक फायदेशीर ठरू शकते .कारण त्यामुळेच आपल्या व्यक्तिमत्वाचा  बुद्धीचा विकास होऊ शकतो .

          दोघांच्या भांडणात तिसऱ्याचाच  लाभ

    
    एकदा एका सिंहाने आणि अस्वलीने एकच झडप घेऊन  एका हरणीला यमसदन दाखविले .पण गंमत अशी की ,ही शिकार कोणाची या गोष्टीसाठी सिंहात आणि अस्वलीत चढाओढ सुरु झाली. दोघांचाही संघर्ष समतोल सुरु होता व हे सर्व दृश्य एक कोल्हा लपून बघत होता .त्यांचे युद्ध थांबले .अस्वल आणि सिंह दोघेही थकून जमिनीवर पडले  ते एवढे थकले होते की ,त्यांना जागेवरून उठताही येत नव्हते .या सर्व गोष्टींची खात्री करून तो कोल्हा  पुढे सरकू लागला .त्याने त्या हरिणीला त्या दोघांमधून उचलून पळवून नेले .तेव्हा तो सिंह म्हणाला ,''अरे ,अरे ! काय  आपलं भाग्य बघा .हा एवढा जीवाचा आटापिटाहा त्रास कशासाठी सोसलातर या कोल्ह्यासाठी.''
तात्पर्य-  दोघांच्या भांडणात कधी कधी तिसऱ्याचाच  लाभ होतो.

                        कावळा व साप

   
    एकदा एक साप नदीच्या किनारी झोपून उन्हाचा आस्वाद घेत होता. त्यावेळी तिथे अचानकपणे एक कावळा आला व त्याने त्या विषारी सापाला आपल्या पायांच्या नखांनी  घायाळ करून त्याला आपल्या नखांमध्ये घेऊन उडू लागला .त्या सापाने कावळ्याच्या पंजातून निघण्याचा खूप प्रयत्न केला .
    सापाने कावळ्याच्या शरीरास दंश केला व त्याच्या दंशाने  कावळा जखमी झाला .तो आकाशातून थेट जमिनीवर येऊन पडला .साप कावळ्याच्या पंजातून पळ काढून निघून गेला .पण कावळ्याच्या शरीरात विष पसरल्याने तो मरणाच्या दारात आला .मग त्याने मनात विचार केला की ,जर मिया गोद्र सापाला पंजात उचलले नसतेतर आज तोच साप  माझ्या मृत्यूचे कारण झाला नसता.
 तात्पर्य :- विचारी माणसं  विचार करून कृती करतात परंतु अविचारी माणस कृती केल्यानंतर विचार करत बसतात .

                   शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ


विचारात गुंग असलेले चोरोबा कुणाच्या तरी अंगावर आदळले .तो एक साधू होता .साधू बघतच चोरोबांना फार आनंद झाला. एकदम लोटांगणच घातले बोवाजीपुढे. बोवाजींनी आशीर्वाद दिला,'' बेटा सुखी राहा!''
तरी चोरोबांनी साधू-चारणा वरून डोके उचलले नाही,''बोल ,काय हवं तुला तू मागशील ते मी देईल.''   ''साधू महाराज मी एक चोर आहे .मला चोरी करतानाच नेहमी शिपाई पकडतात. तरी अशा वेळी मला कोणी बघू शकणार नाही अस करा .''
        साधूबाबांच्या  गालाला खळी  पडली. ते म्हणाले,' ठीक आहे  ! ही घे जादूची भुकटी नाकात ओढताच तू दिसेनासा होशील, ''
    चोरोबा खुश झाले. चांदोबा डोईवर आला .भुकटी ची कमरेला खोचून ते कामगिरीला निघाले .सावकाराच घर आलं. चोरोबांनी भिंत पार केली .खिडकीतून तिजोरी जवळ गेले .तिजोरी उघडायचे समान मेजावर ठेवले आणि साधू बाबांचे नाव घेत जादूची भुकटी नाकात कोंबली .
               ''फड....!फड......!आ  ..क   शी!!''  चोरोबांना शिकांनी अगदी हैराण केले . जानवे चाचपत सावकार उठला .दांडे सावरीत नोकर उठले ..दिवे लागले... उजेडात तीजोरीशी खाट-खुट करीत असलेले चोरोबा दिसले. ताबडतोब या मंडळींनी चोराला पकडले. भोळसट  चोरोबांना जादूची भुकटी चांगलीच भोवली ! कारण ती  तपकीर होती .
  तात्पर्य :- शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
                    

                        गाढव आणि सिंह

       एक गाढव आणि सिंहामध्ये खूप मैत्री होती. परंतु  त्यांचा स्वभाव मात्र खूप वेगळा होता .ते दोघे ज्या ठिकाणी जात असतत्यांच्या येण्याने जंगलातले सगळेच प्राणी जंगलात पळत असत. गाढवाला एकच भ्रम होता कीहे सर्व प्राणी त्याला बघूनच पळत आहे ,पण खर तर ते सिंहाला घाबरून पळत होते.
   एकदा जंगलात फिरत असतांना त्यांना एका  कोल्ह्याची  टोळी दिसते .ते पाहून गाढवाच्या अंगात जसे नव्यानेच प्राण येतो तो त्या दिशेने तोंड उघडे करून धावत जातो. आणि त्यांच्यावर  हल्ला चढवतो .त्याच्या हल्ल्याने  बेसावध असलेली कोल्ह्याची टोळी  इतरत्र पळत सुटले. कोल्हे  हेदेखील बघत नाहीत   की ,त्यांच्यावर हल्ला करणारा कोणता प्राणी आहे . हे पाहून गाढवास खूपच आनंद होतो .मोठ्या गर्वाने पावले टाकीत तो सिंहाकडे योतो  .त्यावर सिंह म्हणाला, काय झाले मित्र,तू इतका दमलास कशामुळे त्यावर गर्वाने फुगलेला गाढव म्हणाले  अरे,काही नाही रे ते मला  बघून इतक्या  जोरात पाळले की ,त्यांना वाटले की  मी त्यांना खायालाच आलो आहेकिती घाबरट आहे ना ते.  याचे बोलणे एकूण सिंह  पोट धरून हसू लागला. अरे हेच कारण आहे तू खुश असण्याचे अरे तू माझा जिवलग  मित्र आहेस पण तू हे देखील लक्षात ठेवले पाहिजे  की तू एक गाढव आहेस. सिंह नाहीस .  ते कोल्हे तुला नाही तर मला बघून पळाले. कधी एकटे असतांना असे कृत्य  करू नकोसनाहीतर तेच कोल्हे  तुझे तुकडे करून खातील.
  तात्पर्य-  दुसऱ्याच्या शक्तीचा वापर करून कोणाशी शत्रुत्व करू नये.

                           मधमाशी पोळे  
एका चोराने एकदा बागेतली मधमाशांची पोळी चोरली. बागेच्या मालकाने येऊन पाहिले तो पोळी नाहीशी झालेली ! तेव्हा ती कोणी चोरून नेली असावीत याचा विचार करीत असतानाच बाहेर गेलेल्या मधमाशा, मध घेऊन तेथे आल्या व पोळी नाहीत असे पाहून यानेच आपली पोळी नेली असावीत. असे समजून त्यांनी एकदम त्या मालकावरच हल्ला चढवला.

तेव्हा तो मालक त्यांना म्हणाला, 'अरे, कृतघ्न प्राण्यांनो ज्याने तुमची पोळी चोरून नेलीत त्याला तुम्ही सोडलंत. अन् मी जो तुमचा मालक, तुमची पोळी चोरीला गेल्याने तुमची आता काय व्यवस्था करावी या काळजीत पडलोय. तर तुम्ही मलाच नांग्या मारून दुखावता ? वा रे वा !'

तात्पर्य

- कधी कधी आपला खरा जो मित्र आहे त्यालाच शत्रू समजून आपण त्रास देतो. परंतु तसे करणे मूर्खपणाचे आहे.

                               बगळा व लांडगा  

       एकदा एका लांडग्याच्या गळ्यात बोकड मारून खाताना त्याचे हाडूक अडकले, त्यामुळे लांडग्याचा जीव कासावीस झाला. भेटणार्‍या प्रत्येक प्राण्याला ते हाडूक काढून देण्यासाठी विनवू लागला. तसेच ते काढून देणार्‍याला बक्षीसह देण्याचे त्याने कबूल केले. तेव्हा एक बगळा बक्षीसाच्या आशेने ते काढून देण्यास तयार झाला. त्याने आपल्या लांब चोचीने ते हाडूक काढून दिले. नंतर तो बक्षीस मागू लागला. तेव्हा रागाने लांडगा त्याला म्हणाला, 'तू किती मूर्ख आहेस. तू माझ्या तोंडात मान दिली होतीस तरी ती न चावता मी तुला जिवंत सोडलं, हे बक्षीस कमी आहे का?'

तात्पर्य
- दुष्टांवर उपकार केले तरी ते त्याची फेड अपकारांनीच करतात हे आपण विसरू नये.

                               गुलामगिरी

   एकदा एक कुत्रा एका सिंहाला म्हणाला, 'अरे, तुझं जीवन किती दुःखी आहे. सगळा दिवस उपाशीपोटी भक्ष्य शोधत हिंडावं आणि ते मिळालं नाही तर प्रेतासारखं पडून रहावं. मला तर तुझी कीवच येते. त्यापेक्षा मी बघ कसा धष्टपुष्ट आहे, सुखी आहे.'
यावर सिंहाने उत्तर दिले, 'मित्रा, तू म्हणतोस ते खरं आहे. तुला वेळच्या वेळी व्यवस्थित खायला मिळतं हे अगदी खरं आहे. पण त्याचबरोबर तुला गळ्यात साखळीही सतत बाळगावी लागते. माझं तसं नाही. मला खाणं मिळालं नाही तरी मी स्वतंत्र आहे. गुलामगिरीतल्या चैनीपेक्षा स्वतंत्रतेत भुकेनं मरण आलेलं परवडलं !'
                                    
                                         मूर्ख कोळी 

     एकदा एक चिमणी माशा मारून खात होती. ते पाहून एका कोळ्याला फार राग आला. त्याला वाटले, माशा मारण्याचा हक्क फक्त आपल्यालाच आहे म्हणून त्याने चिमणीभोवती जाळे विणण्यास सुरुवात केली. परंतु, ते तोडून चिमणी उडून गेली. ते पाहून तो म्हणाला, 'पक्षी धरण्याच्या भानगडीत मी उगाच पडलो. ते माझं काम नाही.'

तात्पर्य
- आपले सामर्थ्य किती आहे याचा विचार न करता कुठली गोष्ट करू नये.
                              
                                        संयम        
       एक कोल्हा पाण्यात पोहत असताना बराच खाली गेला व दमल्यामुळे विश्रांती घेण्यासाठी तो एका चिखलाच्या जागी जाऊन बसला. तेव्हा त्याच्या अंगावर एक मोठा माशांचा थवा आला आणि त्याला चावू लागला. जवळच बसलेल्या एका साळूने त्याला विचारले, 'मी यांना हाकलून देऊ का ?' तेव्हा कोल्हा म्हणाला, 'नको ग बाई, इतका वेळ माझं रक्त पिऊन त्याचं पोटं भरलं असेल. तेव्हा आता त्या त्रास देणार नाहीत. त्यांना जर तू हाकलून लावशील तर मात्र ताज्या दमाचा दुसरा थवा माझ्या अंगावर येईल अन् माझं रक्त शेषू लागेल त्याचं काय ?'

                                 जशास तसे       
     एकदा एका कोल्ह्याने एका करकोच्याला आपल्या घरी जेवायला बोलावले आणि खिरीने भरलेले एक सुंदर ताट त्याच्यापुढे ठेवले. करकोच्याला लांब चोचीमुळे ते काही खाता येईना. कोल्ह्याने मात्र ताट चाटूनपुसून लख्ख केले. बिचारा करकोचा तसाच उपाशी राहिला.
     थोड्या दिवसांनी करकोच्याने कोल्ह्याला मेजवानीस बोलावले व त्याची फजिती करावी म्हणून एका सुरईत आंबरस घालून त्याला दिला. सुरईचे तोंड खूपच लहान असल्याने कोल्ह्याला ते खाता येईना. करकोच्याने मात्र आपली लांब चोच खुपसून तो आंबरस संपवला. 
तात्पर्य: दुसर्‍याची चेष्टा करून समाधान पावणे हे दुष्टपणाचे लक्षण आहे 

No comments:

Post a Comment